सांगली न्यूज नेटवर्क
तासगाव /कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या रत्नागिरी ते नागपूर क्र .166 या राष्ट्रीय महामार्गावरील मौजे घोरपडी -विठ्ठलवाडी या गावातील रहादारी या रस्त्यावर असते . त्यासाठी या ठिकाणी या उड्डाणपूल आवश्यक होता . विठ्ठलवाडी येथे पूर्व पश्चिम भुयारी मार्ग व उड्डाणपूल आणि बायपास रस्ता व्हावा अशी मागणी आमदार सुमनताई आर .आर .आबा पाटील 26 ऑगस्ट 2019 या . पत्राद्वारे केली होती या मागणीप्रमाणे राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरण सोलापूर यांच्या कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता . त्याचप्रमाणे या प्रस्तावास 25 कोटी रुपयांची निधी मिळून नुकतीच या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली आणि लवकरच या कामास सुरुवात होईल